भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी हा UPSC/MPSC व दर परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा, आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या काळात प्रशासनात सक्रीय होण्याचा दृष्टीकोन ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय मा.श्री..धिरज कुमार यांनी दि. २५ जानेवारी, २०१६ रोजी सभेचे आयोजन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र सुरु करण्याकरीता मंजूरी दिली. मा.जिल्हाधिकारी महोदयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे १०० विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली. त्यानुषंगाने सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून दि. २६ जून, २०९६ रोजी सामाजिक न्याय भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले. स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राकरीता लागणारे आवश्यक साहित्य, विद्यार्थ्यांकरोता स्पर्धात्मक परिक्षांची पुस्तके, मॅग्झीन्स, इंटरनेट सुविधा, संगणक संच इत्यादी करीता रु.२५.०० लक्ष चो तरतुद करण्यात आली.
सदर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राकरीता दरवर्षी १०० लाभार्थ्यांच्या निबडीकरोता परीक्षा घेवून गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. सन २०१६-१७ पासून ते आज पर्यंत जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये २५ विद्यार्थी स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेले असून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
